Posts

Showing posts from January, 2017

भिमसैनीक साहीत्यसम्राट आण्णा भाऊ साठे

Image
तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णा भाऊ साठे (ऑगस्ट १, इ.स. १९२० हे मराठी लेखक व समाजसुधारक होते. वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारा, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. ग्रामीण ढंगातील रांगड्या तमाशाला 'लोकनाट्य` हे बिरुद शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी दिले [संदर्भ हवा]. अण्णा भाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकनाट्यांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्‍न केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून निर्माण झालेल्या मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्मितीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, अमर शेख व शाहीर कॉ. द.ना. गव्हाणकरांचे मोलाचे योगदान होते. अण्णा भाऊ साठे हे अंतर्बाह्य मार्क्सवादी होते. अण्णा भाऊ साठे म्हणजे जातींच्या उतरंडीमुळे शिक्षणापासून, समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व होते. वैयक्तिक दुःखांचा विचार न करता; आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांड...

लेखनी ढसाळाची

बोलत होती लेखनी सळसळवीत होती रक्त हक्कासाठी मैदनात उतरवीत होती मानस शब्दातच भरला होता आगेचा निखारा जागी करत होती, भीम सागर हा सगळा भरला लाटेनी किनारा,शब्दानी उसळी शब्दा शब्दा ने बनली कवीता झोपलेल्या मानसाला उठवी बोलत होती लेखनी सळसळवीत होती रक्त गुलामी होती संपवत आन्यायाविरोद्धात होती लढत मानुसकीची लढाई लढत होती मानस आजही लढा चालू ,लढत आहेत मानस                               - गायकवाड मनोज कोंडीबाराव

जिजा

Image
जिजा,      पोतराजाचा पोरगा तु तुला बाबासाहेब कळला म्हणुनच तु मानवी हक्कासाठी लढला बाप तुझा गरीबीची पुजा करत गेला आंगावरती चिद्या,पायात घुगरू बाधून निच प्रथा पुढे नेत गेला पोटासाठी लाचार पोतराच जगन भिक मागुन नाही घरात दान झोली भरायला दारोदार फिरन जिजा,      पोतराजाचा पोरगा तु तुला बाबासाहेब कळला म्हणुनच तु मानवी हक्कासाठी लढला डोक्यावरती देवीच वड वाढल होत तीनच समाजाला गुलामीत ठेवल होत तुला भिमसुर्य कळला आंधारतल्या वाटेवरती ऊजेड दीसला तुझ्या पोतराज बापाची ऊर्जा आली कामा मागीन मी चार घर जास्त महाराच्या पोरासारख शिक येथुन तुझा भिमसंघर्ष सुरु झाला शिक्षणास तुझ्या प्रारभ झाला आन्याय,आत्याचार,गुलामी च्या विरोधात मनुवाद्यान्या फाडण्यासाठी पॅथर उभी झाली त्यात तुही गर्जरास नामांतरात भाग तु घेतलास आस्मिमेतेचा लढा तु लढलास भिमसैनीकाच कार्य तु केलास गुलामी,आन्यायाचे ओझे डोकी घेऊन वाहण्यार्याचे झाडे तु कापलास बापासहीत दुसर्यानाही मुक्त केलास सामाजिक स्वातंत्र्यासाठी,गावकुशीचे काम सोडवण्यासाठी,आर्थिकदुस्थ्या संपन्नतेसाठी आभिमानाच्या...

एकनाथ आवाड

Image
बीड जिल्हातल्या दलित चळवळीत नेते आणि मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ आव्हाड (किंवा एकनाथ आवाड) ह्यांचा जन्म १९५० किंवा १९५१ साली बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातील दुकडेगावात (डुकरेगावात) एका गरीब मातंग समाजातील पोतराजाच्या घरी झाला. वडिलांचे नाव दगडू आणि आई चे भागूबाई. शिक्षकांनी शाळेत दाखल करताना १९ जानेवारी १९५६ ही तारीख लिहिल्यामुळे तीच त्यांची अधिकृत जन्मतारीख झाली. घरात खायला दाणा नाही, वडील मागून आणतील त्यावर गुजराण करावी लागे. एकनाथाने पोतराजच व्हावे अशी वडिलांची इच्छा होती, पण आईने कडाडून विरोध केल्याने त्यांना शाळेत जायला मिळाले. शाळेत मागच्या बाकावर बसूनच ते शिकले. आव्हाडांनी घर सोडले, अंगमेहनत करून पैसे मिळवले आणि शिक्षण घेतले. एकनाथ आवाड ऊर्फ जिजा (जीजा) यांचे शालेय शिक्षण लऊळ येथे झाले तर महविद्यालयीन शिक्षण बीड आणि अहमदनगर येथे झाले. अहमदनगर येथील कॉलेजातून त्यांनी एल्‌एल.बी. केले. ते एकीकडे एम.एस.डब्ल्यू. झाले आणि दु्सरीकडे वकीलही झाले. वडिलांचे केस कापून आवाड यांनी पोतराज प्रथेवर पहिला घाव घातला. घरातूनच संघर्ष सुरू करून त्‍यांनी पोतराजाच्या प्रथेत...

भिमसैनीक नामदेव ढसाळ

Image
नामदेव लक्ष्मण ढसाळ (जन्मः फेब्रुवारी १५, इ.स. १९४९ पुणे जिल्हा मृत्यू: जानेवारी १५ इ.स. २०१४[१]) हे मराठी दलित साहित्यात परिवर्तन घडवणारे लेखक आणि दलित चळवळीतील नेते होते. महानगरीय जीवन आणि बोली भाषा या विषयांवरील मराठीतले महत्त्वाचे लेखन त्यांनी केले. नामदेव ढसाळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ रोजी पुणे जिल्ह्यातील एका खेडेगावात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यामुळे लहाणपणीच ते वडिलांसोबत मुंबईला आले. पुढे मुंबईतील गोलपीठा या रेड लाइट भागात त्यांचे बालपण गेले. त्यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर नितांत श्रद्धा होती. दलित चळवळीकडे आकर्षित झाले. काव्य, गद्य, वृत्तपत्रांतील स्तंभलेखन यातून आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार तितक्याच प्रखरपणे मांडण्याचे काम ढसाळ यांनी केले. दलितांचे, शोषितांचे जीवन स्वतः भोगलेला, अनुभवलेला हा सिद्धहस्त लेखक, कवी, कादंबरीकार, नाटककार होता. .त्यांच्या क्रांतिकारी साहित्याची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली. नामदेव ढसाळांचे बालपण मुंबईतील गोलपीठा भागातील झोपडपट्ट्यांमध्ये अत्यंत गरिबीत गेले. त्यांचे वडील खाटीक होते. त्यांनी स्वतः मुंबई...

भिमसैनीक एकनाथ आव्हाड

Image
मी जन्मानं एकनाथ दगडू आवाड. माझे आईबाप मांग. धर्मानं हिंदू. माझ्यावर धाडले गेलेले मारेकरीही मांग. धर्मानं हिंदू . समोर कुणीही असू दे पार्था, हत्यार उचल. मारणं- मरणं हे तुझ्या हाती. पाप-पुण्याचा हिशोब मी करेन.… असं तत्त्वज्ञान सांगणारा हिंदू धर्म. मनुष्य व्यवहारांना अठरा लक्ष योनींच भय घालणारा. गुलामांची कप्पेबंद चळत उभारणारा हिंदू धर्म. याच धर्मानं माझ्या मायबापाला कष्टात खितपत ठेवलं. याच धर्मानं माझ्या जातीला शिक्षणापासून लांब ठेवलं, गुन्हेगारीसाठी प्रवृत्त केलं. मी तो मार्ग नाकारला. माझी वाट चालत इथवर आलो. जातीशी भांडलो, जातीबाहेरच्यांशी भांडलो. कार्यकर्ता झालो, नेता झालो. माझ्यातल्या उर्मीनं मला इथवर आणलं. पण मग माझ्यावर हल्ला करणारे गुन्हेगार का झाले ? माझं आयुष्य घडलं तसं त्यांचं का घडू शकलं नाही ? का त्यांना पैशांची भुरळ पडली ? कारण त्यांना सतत ' मांग ' ठेवण्यात आलं ? कुणी ठेवलं ? या समाजव्यवस्थेनं. नव बौद्धांनीही मांगांना आपलं मानलं नाही. वेगळं वागवलं म्हणून ते भरकटले. मग आमच्यासाठी खरा मार्ग कोणता ? मुक्ती कोण पंथे ? अर्थात बाबासाहेबांनी दिलेला मार्गच खरा अक्षय मा...